🔥तारासावंगा शेत शिवारात वाघाचा धुमाकूळ,रोज एका गाइवर हल्ला,शेतकरी वर्गात दहशत.
आष्टी शहीद -/ तारासावंगा येथे वाघाच्या हल्ल्यात तिनं जनावरे ठार झाले असून वाघाची दहशत कायम आहे. रोज होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या तारासावंगा जंगलात वाघाचा मुक्त संचार असताना वाघ हा पाण्याच्या शोधात कळ नदीच्या पात्रात फिरतो. असे असताना वाघ हा थेट जाणवराच्या गोठ्यात शिरून हल्ला करतो व जीवाणीशी ठार करतो. रोज हा प्रकार चालू असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. वाघाचा बंदोबस्त करावा म्हणून वनविभाग यांच्या कडे मागणी करण्यात आली. वनविभाग याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप गावकरी करीत आहे.