🔥बायपासनी जाणाऱ्या बसेस बस स्थानकावर आणण्याकडे लक्ष द्यावे.🔥देवळी बस स्थानक लोकार्पण सोहळा संपन्न.
देवळी -/ ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या विद्यालय व महाविद्यालया मधील शिक्षणाकरिता दररोज येणे जाणे करतात पण अनियमित बस सेवेमुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो ही समस्या दूर करण्याकरिता परिवहन विभागाने लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाकडे लक्ष देण्याचे नितांत गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.त्यांनी सांगितले की बायपास ने जाणाऱ्या बस गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्याकरिता प्रत्येक बस गाडी बस स्थानकावर आणण्याकरिता कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात यावे सेलू वर्धा देवळी ही बस स्थानक सर्व सोयी युक्त असल्याने प्रवाशांना ऊन पाऊस यातून सौरक्षण मिळालेले आहे.महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ४५० बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याची मोहीम राबवून ती पूर्ण केली.देवळी येथे सुसज्ज बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर पार पडला यावेळी माजी खा.रामदास तडस,आमदार राजेश बकाने,भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश ईखार,भाजप शिरचिटणीस प्रा.राहुल चोपडा,पुलगाव चे तहसीलदार स्नेहा क्षीरसागर,एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रण प्रताप राठोड,यांच्यासह एस टी महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून बस स्थानकाचे फीत कापून लोकार्पण करण्यात आले.माजी खा रामदास तडस यांनी आपल्या भाषणात सुपर बस थांबण्याकरिता व बस थांबण्याकरिता आंदोलन करावे लागले याच आंदोलनामुळे आपली राजकीय सुरुवात झाली याच संघर्षामुळे जनतेनी आपल्याला आमदार खासदार पदी विराजमान करून जनतेची विकास कामे करण्याची संधी दिली विकास निधी व प्रवाशांना होणारा त्रास थांबवण्याकरिता पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली.आमदार राजेश बकाने यांनी आपल्या भाषणामध्ये प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याकरिता दहा बसेस देण्यात याव्या हा मुद्दा पुढे करून बस स्थानके स्वच्छ ठेवण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे व कर्मचारी नियुक्त करावे बायपासनी जाणाऱ्या बसेस आणण्याची सक्ती करण्यात यावी बस स्थानकावर आणण्याची सक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. याप्रसंगी प्रादेशिक व्यवस्थापक गभणे एसटी महामंडळाच्या बसेस व उत्पन्नावर सविस्तरपणे आपल्या भाषणातून माहिती सांगितली.देवळी बस स्थानकावरून दररोज तीन हजार विद्यार्थी पास ने प्रवास करतात त्यांच्या प्रवासाची गैरसोय दूर व्हावे याकरिता बसेस तातडीने देण्यात याव्या असे राजेश बकाने यांनी मागणी केली.तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक अधिकारी शितल तांबे यांनी केले तर संचालन अतुल शंभरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पुलगाव डेपो व्यवस्थापक सुरज बोबडे यांनी आभार मानले या कार्यक्रमाला महिला व पुरुषांनी, तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.