आष्टी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांच्या अफलातून व विवादास्पद आदेशामुळे उद्भवलेला वाद…..

0

🔥आष्टी नगरपंचायत च्या मुख्याधिकारी यांच्या अफलातून व विवादास्पद आदेशामुळे उद्भवलेला वाद.

आष्टी -/ नगरपंचायत च्या पदावर पदभार सांभाळणारे मुख्याधिकारी ए बी गडलिंग यांनी वाद ग्रस्त व अफलातून काढलेल्या आदेशामुळे शहरवासीयांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे मुख्याधिकारी यांनी पदभार सांभाळतात शहरातील समस्येकडे लक्ष न देता नागरिकांची समस्या वाढविण्याचे काम करत असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी यांनी मुनादी द्वारे आष्टी शहरवासीयांना कळविले आहे की ज्या नागरिकाकडे घराचे कर किंवा पिण्याच्या पाण्याचे कर थकीत असेल त्यांच्यावर दोन टक्के व्याज आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे नगरवासीयांना कोणत्याही प्रकारचे नगरपंचायत मधून ना हरकत प्रमाणपत्र किंवा अन्य कागदपत्र लागत असेल तर त्यांना सन 25 26 चे सुद्धा कर भरावे लागेल अन्यथा कोणतेही कागदपत्रे मिळण्यात येणार नाही अशी मुनादी दिली. अगोदरच आष्टी वासियांचे सन 22 23 च्या तुलनेत घरांचे कर दुप्पट झाल्याने नागरिकांमध्ये नगरपंचायत विरुद्ध नाराजी दिसत आहे. कर भरण्याची कालावधी 1 एप्रिल ते 31 मार्च या प्रमाणे कालावधी असते नियमानुसार चालू आर्थिक वर्षाचा कर मागणे ही सामान्य प्रक्रिया असली तरी भविष्यातील वर्षाचा कर आधीच मागने हे विवादास्पद दिसत आहे .नगरपंचायत गंभीर आर्थिक संकटात सापडली असल्याने नगरपंचायतच्या खात्यात पैसे नसल्यामुळे धनादेश वटत नाही आणि कोणीही उधारी त साहित्य देण्यास तयार नाही या आर्थिक ड बघाईमुळे नगरपंचायत विकास कामे करू शकत नाही. नगरपंचायतच्या मते मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करापोटी जेवढी वसुली होते तेवढ्यावरच कामकाज चालवायचे लागते याकरिता ते आष्टी वासियांना वेठीस धरत आहे
एकंदरी नगरपंचायत मध्ये अनेक समस्या आहेत ज्याकडे लक्ष दिले जात नाही अनेक भागांमध्ये रस्त्याचे दिवे बंद आहेत. नाले भरले आहेत ,ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊन समस्या वाढत आहे साहित्य खरेदी आणि विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम महिन्यापासून ठप्प आहे. त्याचप्रमाणे जलशुद्धीकरण केंद्रावरून येणारे पिण्याचे पाणी सुद्धा गढूळ येत आहे. नगरपंचायतला लागूनच रस्त्यावर उघड्यावर मटन विक्रेते आणि मासवीक्रेते व्यवसाय करतात या उघड मास विक्रीमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत या मास विक्रेत्यांच्या जवळच भाजी मार्केट, शाळा, ग्रामीण रुग्णालय असून गावात येणारा मुख्य रस्ता आहे .या मुख्य रस्त्यावर उघड्यावर मास कापल्यामुळे व विक्री होत असल्यामुळे त्या सर्व ठिकाणी माशांची समस्या निर्माण झाल्याने शाळकरी मुलांचे व जनतेचे आरोग्य धोक्यात आलेले आहे मासाचे तुकडे रस्त्यावर पडल्यामुळे तिथे कुत्रे गर्दी करतात, हे कुत्रे नागरिकांवर आणि शाळकरी मुलांवर हल्ला करण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत अनेक शहरांमध्ये उघड्यावर मास विक्री करण्यास बंदी घातल्या गेली आहे .तरीसुद्धा आष्टी नगरपंचायत याकडे डोळेझाक पणे करत आहे. मुख्याधिकाऱ्यांचे मुख्य कर्तव्य नगराची साफसफाई करणे ,अतिक्रमण हटवणे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे असते ,मात्र आष्टी मध्ये या सर्व बाबीकडे दुर्लक्ष होत असून असल्याचे दिसून येते. आष्टी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी मुख्याधिकारी यांच्या बेकायदेशीर आदेशावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे

नरेश भार्गव साहसिक News-/24 
आष्टी शहीद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!