देवळी शहरातील मित्राचा मित्रावर चाकूने हल्ला….

0

🔥मात्र गृहरक्षकामुळे वाचले प्राण.

देवळी -/ शहरातील बस स्थानक परिसरातील इंदिरा गांधी पुतळ्याजवळ दोन मित्रांचा सकाळी दहा वाजताच्या सुमारास शाब्दिक वाद होऊन प्रकरण हाणामारी व सुऱ्याने वार करण्यापर्यंत प्रकरण घडले.देवळी येथील दोन युवक लोखंडी शटर गिरीश देण्याचे व दुरुस्तीचे काम करतात दोघेही जिवलग मित्र असून आज या दोघांचे कोणत्याही तरी कारणावरून प्रथम शाब्दिक भांडण झाले व या भांडणाचे रूपांतर हाणामारी व जीव घेण्यापर्यंत गेले.फय्याज खान सिकंदर खान पठाण वय ३६ वर्ष याला त्याचा जिवलग मित्र सय्यद मोहम्मद सय्यद वाहाब याने धारदार सुऱ्याने वार करून जखमी केले परत पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करणार तेवढ्यातच गृहरक्षक राजेंद्र नवथरकर यांनी मारेकऱ्यांचा हात पकडून सुऱ्या हिसकल्याने फय्याज खानचा जीव वाचला.गृहरक्षक राजेंद्र नवथरकर यांच्या धाडसामुळे यांच्या धाडसाचे कौतुक होत असून इतरही युवकांनी धाडस करून होणाऱ्या गुन्ह्याच्या घटना थांबवण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे असले पाहिजे. तरी अशीच घटना यापूर्वी देवळी येथील पोलीस वसाहती समोर व भिडी येथील एका विद्यार्थिनीवर हल्ला घडलेला आहे.होणाऱ्या घटना नागरिक बघत असतात पण धावून जात नाही त्यामुळे गंभीर घटना घडतात.फय्याज खान मित्रांकडून जीव घेण्या हल्ल्यात जखमी झाला पण त्याने पोलीस स्टेशन येथील तक्रार नोंदविली नाही या संदर्भात घटनास्थळी देवळी पोलिसांनी तातडीने पोहचून जखमीला देवळी येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचाराकरिता दाखल केले फय्याज खान ला तक्रारी विषयी विचारले असता त्यांनी माझा जिवलग मित्र असल्यामुळे तक्रार नोंदवत नसल्याचे सांगितले.जीवावर बेतून सुद्धा जीव घेणाऱ्या मित्राच्या विरोधात तक्रार न नोंदविणारा जिवलग मित्र मित्रा विषयी सर्वत्र देवळी शहरात चर्चा होत आहे.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!