🔥निषेध मोर्चाला आ.राजेश बकाने यांनी केले मार्गदर्शन,तहसीलदाराला दिले निवेदन.🔥सर्व धर्मीय समाज बांधवांचा सहभाग.
देवळी -/पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून निष्पाप पर्यटकांनवर गोळीबार केला यात २८ पर्यटक मृत्युमुखी पडले या घटनेचा निषेध करण्याकरिता सोमवारी देवळी शहरातील बाजारपेठ बंद ठेवून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.गांधी चौकामधून सकाळी ११ वा. गांधी चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने फिरून तहसील कार्यालयावर ह्या मोर्चांनी धडक दिली.या मोर्चामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल, शिवसेना,भारतीय जनता पक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,देवळी पत्रकार संघ, व्यापारी संघटना,बहुजन समाज पार्टी, बौद्ध बांधव,युवा संघर्ष मोर्चा,मुस्लिम बांधव,तसेच गावातील नागरिक व व्यापारी या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले होते.आतंकवाद्यांचा खत्म करा पाकिस्तानला धडा शिकवा व योग्य कारवाई करा अशा मोर्चातून घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयावर मोर्चा धडकल्यावर आमदार राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली या सभेमध्ये माजी नगराध्यक्ष शोभा तडस,भाजपा सरचिटणीस राहुल चोपडा,माजी नगर अध्यक्ष सुरेश वैद्य,अब्दुल जब्बार तव्वर,बंडू जोशी,किरण ठाकरे,मोरेश्वर खोडके,रितेश लोखंडे,मोहन जोशी,यांनी निषेध करून विचार व्यक्त केले.आमदार राजेश बकाने यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचे तीव्र दखल घेतली असून केंद्र सरकार दहशतवाद्यांना खात्मा करण्यासाठी आणि पाकिस्तान सरकारला धडा शिकवण्याचे तातडीने पाऊल उचलून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांना देण्यात आलेल्या सर्वपक्षीय निवेदनातून शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आमदार राजेश बकाने यांनी या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी होऊन गावाची एकजूट दाखवण्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार मानले. या मोर्चामध्ये प्रामुख्याने दिनेश शिरसागर,गोल्डी बग्गा,गजानन महल्ले,अनिल शिरसागर, प्रवीण तेलरांधे,हेमंत जावनधिया,अमोल गोडबोले,प्रवीण कात्रे,अशोक पवार,उमेश कामडी,रवी कारोटकर,शुभांगी कुर्जकार,विद्या झिलपे,ज्योती खाडे,आशा वाघमारे,वर्षा बावनकर,निलेश तिडके,सुहास कुरडकर,भय्या बोडखे,अयुब पटेल,नरेंद्र मदनकर,मोहम्मद शफी,टिनू तव्वर,रिझवान तव्वर,जमील शेख,खुशाल कुंबरे,प्रकाश कामडी,आनंद सांडे,किरण तेलरांधे,दिलीप करोटकर,कृष्णकांत शेंडे,गणेश शेंडे,भीमजय म्हैसकर,गुड्डू पठाण,तसेच विविध सामाजिक संघटनाचा व गावातील नागरिकांचा या मोर्चामध्ये सहभाग होता.