वणी -/तालुक्यामध्ये कित्येक दिवसापासून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत आहे. वृत्तपत्र व पोर्टलवरही मोठ्या प्रमाणात बातम्या गाजत आहे. वणी शहर व तालुक्यातही हीच चर्चा सुरू आहे. परंतु कुठे पाणी मुरते काय माहित ? याबाबत महसूल खात्याचा एकही अधिकारी बोलण्यास तयार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वणी तालुक्यामध्ये रेतीची चोरी करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु यामध्ये बरेचदा ठराविक व्यक्तीच रेतीची चोरी करत असल्याचे बोलले जाते. या अवैध रेती तस्करीतून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांसह अधिकारीही गब्बर होत आहे. सदर रेतीच्या चोरीतून अमाप संपत्ती कमवण्यासाठी काही महसूल व पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे ट्रॅक्टर व आयवा असल्याची चर्चा रंगत आहे. त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर आधी कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे वणी तालुक्यातील होणाऱ्या रेती चोरीवर संबंधित तहसीलदार हतबल झाल्याचे दिसून येते. रेती चोरट्यावर व ज्या गावच्या रेती घाटातून रेतीची चोरी होत आहे अशा गावचे संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई न करण्याबद्दल नायब तहसीलदार व तहसीलदार वणी यांची चुपी असल्यामुळे जनतेत तर्कवितर्क काढल्या जात आहे. आता तर वणी तालुक्यातील वाढत्या वाळू रेती चोरीवर आळा घालण्या बाबतची कारवाई थेट जिल्हाधिकारी महोदयांनाच करावे लागेल अशी परिस्थिती आहे. याबाबत जिल्हाधिकारी साहेबांनी वरिष्ठ तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठीत केल्यास अधिकाऱ्यासह अनेक कर्मचारी जाळ्यात अडकतील. वणी तहसीलदार च्या विरोधामध्ये या आधी अनेकदा बातम्या आलेल्या असून रेती चोरी बद्दल जिल्हा भर त्यांची चर्चा सुरू आहे. कधी नव्हे एवढी रेतीच्या चोरीमुळे व त्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे वणी तालुका प्रशासनाची बदनामी होत आहे. विशेष म्हणजे ज्यांचे वाळू व रेती तस्करी वाल्याशी साटे लोटे आहे अशा तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्यावर तहसीलदारांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे हे सर्व बलाट तहसीलदारावर येण्याची शक्यता आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस रेती व वाळूची चोरीची वाहतूक होते. तर दुसरीकडे मात्र गरिबांना एक ट्रॅक्टर ही रेती मिळत नाही. सांगायचे झाल्यास गरीब घरकुल धारकानाही रेती मिळत नाही. सरकारचे धोरणही रेतीच्या बाबत लोकहिताचे नसल्यामुळे चोरट्यांना रेती चोरी करण्यास भाग पाडते. तर दुसरीकडे मात्र घरकुल धारकांना किमान पाच ब्रास रेती मिळण्याचे सध्या तरी कोणतेही आदेश नाहीत. काहीही असो पण वणी तालुक्यातील ही मोठ्या प्रमाणात रेती आहे ती सरकारची संपत्ती आहे. त्याची चोरी होऊ नये. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम महसूल खात्याचे तालुका अधिकाऱ्याचे असते. परंतु त्यांचे लक्ष नेमके कुठे आहे हेच कळण्यास मार्ग नाही. त्यामुळे त्यांचा कार्यालयातील कर्मचाऱ्यावरही वचक राहिला नाही. कार्यालयात केव्हाही येतात आणि केव्हाही जातात. त्यामुळे त्यांच्याकडील मोठ्या प्रमाणात लोकांचे कामे प्रलंबित आहेत. काहीही असले तरी वणी तालुक्यात वाढत्या रेती चोरी वर आळा घालण्यासाठी तहसीलदार वणी हे 100% अयशस्वी झाले असल्याचे दिसून येते. वणी तालुक्यात सरकारची खनिज संपत्ती असलेल्या अमूल्य रेती साठ्याची चोरी होत असेल तर ती साधी बाब नाही. रात्रंदिवस रेतीची चोरी होत असेल तर महसूल आणि महसूल चे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अशा महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष का नाही ? असा लोकांना प्रश्न पडला आहे. तहसीलदार वणी यांच्या दुर्लक्षित पणामुळे होणाऱ्या रात्रंदिवस रेती चोरीमुळे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. ते संबंधितांकडून वसुली होणे गरजेचे आहे. त्यामुळे जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी जनतेची मागणी आहे.