वर्धा /तळोदी येथील पोलीस पाटील विजय यांनी 1 मे ला महाराष्ट्र दिनी सकाळी गावातील मुख्य रस्त्यावरील गोळा झालेला कचरा वेवस्थित गोळा करून त्याची होळी केली आणि परिसर स्वच्छ केला हा त्यांचा उपक्रम केवळ एक दिवस राहत नसून गावातील मुख्य रस्त्यार आठवड्यातुन किमान दोन तास तरी ते श्रमदानं करतात आपन आपल्या घरी स्वच्छ जागेवर बसतो आपल्याला आपले घर स्वच्छ पाहीजे मग आपले गाव स्वच्छ ठेवण्यात आपला सहभाग असला पाहिजे हि भावना ठेऊन ते काम करतात
केवळ गावातील शांतता आणि सुवेवस्थाच नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासून शासणाकडून आलेल्या सूचना देखील ते आपल्या बोलक्या फलकाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न विसरता न चुकता देतात आणि हे काम मी आवडीने निरंतर करत राहील हा त्यांचा संकल्प आहे.