जनतेने पंधरा वर्ष संधी दिले, विकास मात्र पंधरा टक्के सुद्धा नाही!….

0

🔥युवानेते सचिन नाईक हेच ‘लास्ट अँड बेस्ट’पर्याय,उल्हास राठोड. 

माहूर -/ किनवट माहूर हे दोन्ही तालुका आदिवासी बंजारा बहुल भाग असून या विधान सभेत नेते मंडळी आदिवासी व बंजारा समाजाच्या फायदा घेऊन आज पर्यंत निवडून आले हे मात्र सर्वांनाच माहित आहे परंतु आदिवासी समाजाचे आमदार तसेच बंजारा समाजाचे आमदार होऊन गेले.या दोन्ही आमदारांनी आपल्या कार्यकर्दित कोण कोणते विकास कामे केले हे जनतेला माहितच आहे.एक नवीन चेहरा म्हणून
सचिन नाईक यांच्या रूपाने किनवट माहूर तालुक्याला दूरदृष्टी नेता लाभला असून गेल्या पंधरा ते विस वर्षापासून अविरतपणे गोरगरिबांची निस्वार्थ भावनेने सेवा करत आहेत. किनवट माहूर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधन्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सचिन नाईक हेच ‘लास्ट अँड बेस्ट’पर्याय आहे असे मत जेष्ठ कार्यकर्ते उल्हास राठोड यांनी व्यक्त केले आहे.
मित्र मंडळाच्या माध्यमातून युवानेते सचिन नाईक यांनी किनवट माहूर तालुक्यात आपल्या नेतृत्वाची पकड कायम केली आहे.आगामी विधानसभा निवडणूक ताकतीने लढण्याचा निर्धार त्यांनी केला असून सचिन नाईक मित्रमंडळात सहभागी असलेले उपेक्षित वंचित घटकातील सुशिक्षित युवावर्ग मतदारसंघ पिंजून काढताना दिसून येत आहे.
सचिन नाईक मित्रमंडळाचे सक्रिय सदस्य तथा जेष्ठ कार्यकर्ते उल्हास राठोड यांनी मांडले.

साहसिक news -24 माहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!