🔥तोतया गौरक्षकांनी दिला पोलीस स्टेशनला लिखित माफी नामा.🔥उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांनी केली तोतया गौरक्षकांची कान उघडणी.
देवळी -/देवळीतील गुरांचा बाजार हा संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.येथे गुरेढोऱ्यांची देवाण-घेवाण करण्यासाठी दुरून दुरून शेतकरी व गुरांचे व्यापारी येतात त्यामुळे या बाजाराचे नाव संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे.
परंतु काही दिवसांपासून गौरक्षणाच्या नावाखाली काही देवळी शहरातील तोतये गौरक्षक गुरे ढोरे खरेदी करणाऱ्यांना कत्तल खाण्यासाठी जनावरे का नेतात? या कारणावरून व्यापारी व शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन मारहाण होत आहे.अशीच एक घटना शनिवार २१ जून रोजी काही तोतया गौरक्षकांनी,देवळी बैल बाजारातून एका शेतकऱ्याने तीन गाई खरेदी केल्या व घरी नेण्यासाठी चार चाकी गाडी करून ते बैल बाजारातून आपले जनावरे नेत असताना भिडी परिसरात काही तोतया गौरक्षकांनी गुरांची गाडी अडवून शेतकरी व गाडी चालकास मारहाण करून गाडीचे काच फोडली आणि त्यामुळे हा प्रकरण देवळी पोलीस स्टेशन मध्ये गेला देवळी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता तो शेतकरी देवळी बैल बाजारातून आपल्या घरी नेत होता जेव्हा चौकशीत सिद्ध झाले आणि त्यांच्याकडे विक्री पावती सह सर्व कागदपत्रे होती त्यामुळे तोतया गौरक्षकांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ आली तेव्हा गौरक्षक त्या शेतकऱ्याची व त्या चालकाची माफी मागू लागले व गाडीची झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यास तयार झाले.तेव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी तोतया गौरक्षकांची चांगलीच कान उघडनी केली यानंतर कोणीही कायदा आपल्या हाती घेऊ नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी कडक वार्निंग दिली.आणि हे संपूर्ण प्रकरण अखेर शेवटी तोतया गौरक्षकांच्या माफी नाम्यावर समाप्त झाले.
देवळी बैल बाजारात अशे प्रकार सतत होत असल्यामुळे दुरून येणारे व्यापारी व शेतकरी आता या बाजारात कमी झाले आणि शेतकऱ्यांच्या गुराढोरांनाही पाहिजे तसा मोबदला या बाजारात मिळत नाही त्यामुळे हा बाजार नष्ट होण्याच्या मार्गावर लागला आहे.जर पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अश्या खंडणीखोर तोतया गौरक्षकांचा बंदोबस्त केला नाही तर कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडू शकते असे मत बाजारात येणाऱ्या व्यापारी व शेतकऱ्यांनी केले आहे.(बघा पुढील भागात व्हिडीओ सहित सविस्तर) (क्रमशः)