बोरखेडी गावातील नागरिक अनेक मूलभूत सुविधापासून वंचीत.
🔥”बोरखेडी येथे अनेक समस्या आहे .या कडे ग्रामपंचायत तसेच प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा सुद्धा प्राप्त होत नाही. सुविधेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. भरपूर पाणी असताना सुद्धा ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना आजही डोक्याने पाणी भरावे लागत आहे .आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्हा गावकऱ्यांना सुविधा का मिळत नाही. अधिकारी वर्ग सुद्धा आमच्या मागणी कडे लक्ष देत नाही .येणाऱ्या काही दिवसात जर आमच्या सोडविल्या गेल्या नाही तर आम्ही गावातील नागरिकांसह आमच्या समस्या सुटाव्या या साठी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.(डॉ.तुषार नायकुजी बोरखेडी)