लालपरी बंद असल्यामुळे विध्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी महाविद्यालयाने वाहणाची व्यवस्था करावी

0

 

प्रतिनिधी/देवळी

तालुक्यातील वायगाव (निपाणी) येथे यशवंत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना शाळेत जाण्या येण्याकरिता या अगोदर लालपरी होती परंतु मागील दिढ महिन्यापासून एस.टी. कर्मचारांच्या संपामुळे लालपरीची सेवा बंद आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता कोणतेच साधन नाही. खाजगी वाहणाने काही विद्यार्थी शाळेत जातात परंतु बस सेवा बंद असल्यामुळे त्यांचेपन तिकिट चे दर गगणाला भिडले आहे. खाजगी वाहन ग्रामीण भागाच्या विध्यार्थ्यांना परवडण्यासारखे नसल्यामुळे व विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता भिवापूर येथील सरपंच श्रीकांत पाल यांनी विध्यार्थ्यांसाठी महाविद्यालया मार्फत वाहणाची व्यवस्था करावी अश्या मागणीचे निवेदन देवून विध्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी या निवेदना द्वारे करण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!