शंभर दिवसाच्या आदिवासी विकास कृती आराखड्यात कोलाम जमातीला किती लाभ मिळाला….

0

🔥शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला प्रश्न.?

🔥लवकरच कोलाम समाजाच्या विवीध संघटना एकत्र करून संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करणार असल्याचे पत्रकात नमूद.

 यवतमाळ,झरी -/ शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांच्या रायपुर येथील निवासस्थानी बैठक घेण्यात आली असून या बैठकीला मार्गदर्शन करतांना सांगीतले की देवेंद्र फडणवीस सरकारने आदिवासी विकास मंत्री प्रा अशोक ऊइके यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसाचा आदिवासी विकास कृती आराखडा दिला होता त्याचा अनुसूचित जमाती पैकी कोलाम जमातीला किती फायदा झाला याचा जबाब विचारण्यासाठी लवकरच कोलाम समाजाची विवीध संघटना एकत्र करुण बैठक आयोजीत करणार असल्याचे सांगून रायपुर येथील रस्त्याच्या काम करीता रायपुर गावातील प्रत्येक माणसाने लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसाने सहकार्य केले व मी बिगर सातबारा शेतकरी संघटना शामादादा कोलाम ब्रिगेड संघटने कडून पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण केले त्याची दखल घेवुन काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते राजू येल्टीवार युवक काँग्रेस चे राहूल दांडेकर यांनी पुढाकार घेवुन आमदार संजय दरेकर यांनी उपोषणाची सांगता करून एक महिन्याचा कालावधी दिला होता परंतू चार महिन्याने रस्त्याचे भूमिपूजन केले परंतू प्रतेक्ष्य कामाची सुरवात झालेली नाही लवकरच पावसाळ्याचे सिझन सुरु होत आहे रस्ता जर लवकर तयार झाला नाही तर पुन्हा रायपुर येथील लोकांना शेतीसाठी लागणारी सामग्री जसे खताचे पोते बि बियाणे आणण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी लवकर रायपुर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच जन मन घरकूल योजने अंतर्गत काही लोकांचे घरकूल बांधकाम सुरु आहे परंतू रेती साठी संघर्ष करावा लागत आहे तसेच घरकूल बांधकाम करीता धनादेश वितरणात लोकांचे आर्थिक शोषण होत असल्याच्या बाबी बैठकीत लाभार्थ्यांनी सांगितल्या परंतू घरकुलाच्या लाभार्थ्यांची समजूत काढताना सौ इंदिरा बोंदरे यांनी सांगीतले की आपण बेघर होतो म्हणून सरकणे जन मन योजना सुरु केली त्याचा लाभ प्रत्येक कुटुंबांना मिळाला पाहिजे यासाठीमी स्वतः गटविकास अधिकारी पंचायत समिती झरी येथे जावून भेट घेणार असल्याचे सांगूनशामादादा कोलाम ब्रिगेड च्या वतीने पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे सांगून सरकारने आदिवासीच्या विकासाकरिता जो शंभर दिवसाचा कृती आराखडा दिला होता त्याचा कोलाम जमातीला किती फायदा झाला याबाबत जिल्ह्यात मोठं आंदोलन उभे करणे काळाची गरज असल्याचे इंदिरा बोंदरे यांनी प्रसिध्दी पत्रकातून सांगीतले यावेळी सतीश टेकाम लक्ष्मण अत्राम तुकाराम टेकाम काशिराम तिरणकर बापूराव आत्राम अर्जुन टेकाम महेश टेकाम सीताराम टेकाम कारू तिरणकार सहित रायपुर येथील कोलाम बांधव उपस्थित होते.

दीपक यंगड साहसिक News-/24 यवतमाळ,झरी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!