प्रतिनिधी / हिंगणघाट :
वर्धा जिल्हातील दैनिक सहासिक या वृत्तपत्रचे संपादका रविंद्र कोटंबकर यांचेवर दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी वर्धा नागपूर मार्गावर उड्डाण पुलाजवळ रात्रीप्राणघातक हल्ला झाला. अशा प्रकारचा हल्ला म्हणजे पत्रकारितेवर झालेला सर्वात मोठा आघात आहे.त्या घटनेचा संघाचे वतीने निषेध नोंदवला.व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
आपल्या वर्तमान पत्रातून सतत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पत्रकार सतत आपल्या लेखनीमधून करीत असतात. परंतु अशा प्रकारचे हल्ले करून पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होताना दिसून येत आहे. हिंगणघाट शहरातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच पत्रकार या घटनेचा निषेध करीत आहेत.
या दुर्दवी घटनेत झालेला प्रकार गंभीर आहे
निवेदन देताना हिंगणघाट तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष मंगेश वणिकर ,जेष्ठ पत्रकार विजय राठी राजेंद्र राठी, अनिल अवस्थी,संजय अग्रवाल,नरेंद्र हाडके, संजय माडे,अनिल कडू,अजय मोहोड सह अनेक पत्रकार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!