देवळीतील ठाकरे कुटुंबियांची गौरी स्थापनेला १५२ वर्षांची परंपरा

0

साहसिक न्यूज24
देवळी / सागर झोरे :
देवळी तालुक्यातील सोनेगाव (आबाजी ) येथील रहिवासी किरण वसंत ठाकरे यांच्याकडे गेल्या १५१ वर्षांपासून गौरीची स्थापना करण्यात येत असून या वर्षी गौरी स्थापनेला १५२ वे वर्ष आहे. गणपती बरोबरच येणाऱ्या सणाला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात.
ठाकरे यांच्या कुटुंबात आपल्या कुळदैवताप्रमाणे गौरी बसविली जातात.पहिल्या दिवशी घरातील तुळशीपासून पावलापावलांनी डोक्यावरून गौरींना आणून त्यांची स्थापना केली जाते. दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे जेवण होऊन त्यांचे तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!