पवनार येथील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण नाही तर मग गुन्हे दाखल कसे… तुमच्या मुलावर दिलीपराव…वार्ताहर ‘गण्या’ खपला ३०० रुपयांत

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
पवनार येथील बीड, केदारवाडी येथील सर्वे क्रमांक – 86 , 97 एकुण आराजी 25.23 हे आर . पैकी 15.55 आर . जागेवर शेतीचे अतिक्रमण केलेले आहे वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी ५ मे २०२२ रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३०(१),(b)६३(c) सोबत ५२,७४ नुसार मुरलीधर पंजाब वैद्य, रजत दिलीप वैद्य , सचिन मुरलीधर वैद्य ,श्रीमती . शकुंतला मुरलीधर वैद्य , रोशन योगेश वैद्य, विक्रम योगेश वैद्य , सुरज संजयराव वैद्य, निखिल दिलीप, सर्व राहणार पवनार यांनी अतिक्रमण केले होते. त्या नुसार त्यांच्यावर ५ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले होते व आता त्या जमिनीवरील झाडे तोडल्या प्रकरणी चौकशी सुद्धा सुरू झाली आहे. मग चौकशी सुरु असताना व चौकशीचे आदेश स्वतः श्री सेपट साहेबांनी दिले असताना अर्ध्या हळकंडातून पिवळा झालेला गणेश हिवरे यांने कोणत्या आधारे एका वृतपत्राला खोटी बातमी प्रकाशित केली. वनविभागाच्या कोणत्याच जमिनीवर अतिक्रमण नाही.आणि तशी माहिती पण नाही. अतिक्रमण नाही तर मग गुन्हे दाखल कसे झाले व चौकशी कशाची सुरू आहे मग ते तरी जनतेला सांगावे.
दिलीपराव वैद्य म्हणतात की, आम्ही कोणतेही अतिक्रमण केले नाही उलट आमचीच जमीन पडीत आहे मग खेडकर यांनी तुमचे मुले निखिल आणि राज्जत यांच्यावर गुन्हे कसे दाखल केले ते तिथे फिरायला गेले होते का.? आमची बदनामी सुरू असे सुद्धा म्हणत आहे मग सांगा दिलीपराव तुम्ही २४ सप्टेंबर रोजी वन विभागाच्या कार्यालयात कशाला गेलते आणि माफीनामा का लिहून दिला सांगा जरा जनतेला. चोरी करायची लाज नाही वाटली मग बदनामी होण्याची लाज कशाला वाटून घ्यायची.
गण्या हिवरे नामक वार्ताहरने फक्त तीनशे रुपयांच्या मोबदल्यात आपले इमान विकल्याची चर्चा तर आहेच पण साहसिक च्या बातमीला चार्लेज देऊन उल्लू मशालकीचा कळसच गाठला आहे.आता हा उल्लू वार्ताहराच्या वुत्तानवर जनता कितपत विश्वास ठेवते हेच आता पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!