पुराचे पाणी दारात…आपत्ती व्यवस्थापन मात्र घरात

0

Byसाहसिक न्यूज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा : वर्ध्यात संतप्तधारे सह जोरदार पाऊस आल्याने वर्ध्यातील धाम नदी ही पूर्णपणे ओसंडून वाहत असून नदीला पूर आला आहे अशातच येळाकेळी येथील असलेल्या धाम नदीला पूर आल्याने संपूर्ण नागरिक पुराच्या धाकान घराच्या बाहेर पडले आणि रस्त्यावर आले प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असताना आपत्ती व्यवस्थापन गावात पोचलं नसल्याचं दिसून येत आहे पाण्याचा पूर येणार दारात प्रशासन मात्र झोपून घरात आपत्तीच्या नावावर अधिकारी झोपले धुलईच्या खाली? मात्र नागरिकांना झोपावे कुठे आणि करावे काय अशीच म्हणण्याची वेळ आली आहे . जिल्ह्यात सगळीकडे पाणीच पाणी आणि अशाच संपूर्ण धरण ओसांडून वाहत असल्याने धरणाचा विसर्ग करायला सुरुवात झालेली आहे आणि अशा सूचना देखील करण्यात आलेल्या मात्र नदीकाठच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तर देण्याचा ला मात्र त्यांची व्यवस्थाच प्रशासनाकडून करण्यात आली नाही त्यामुळे प्रशासन आपत्तीच्या नावावर करते तरी काय असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!