वाळू माफियाचा नायब तहसीलदारावर प्राण घातक हल्ला..

0

वर्धा : गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाईसाठी गेलेल्या तलाठी आणि नायब तहसीलदारांवर वाळू माफीने प्राणघातक हल्ला केला.या प्रकरणी आर्वी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे वाळूघाटांची लिलाव झाले नाही.अशात अवैध वाळूची चोरी आणि वाहतूक काही भुरट्या वाळू चोरट्यांकडून केली जात आहे. त्यातच एका भामट्या वाळू चोराने थेट तलाठी आणि नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला केल्याने वाळू चोरट्यांना आशीर्वाद कुणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आर्वी पोलिसांनी या प्रकरणी सुरज चव्हाण यांच्या तक्रारीवरून संदेश गलात आणि समीर घोडे आणि इतर दोन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गणेश रेंगे साहसिक न्यूज 24/वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!