दोन तालुक्यातील गावांना जोडणारा जोडमार्ग डांबरी करणाच्या प्रतीक्षेत.
आष्टी शहीद -/ तालुक्यातील सर्वच गावाच्या मार्गांवर डांबरीकरणाचे काम सुरु असून दोन तालुक्यातील गावांना जोडमार्ग म्हणून परिचित असणारा थार बोटोणा पार्डी ते कारंजा हा मार्ग आज स्तितीत डांबरीकरण कामापासून वंचित आहॆ.
सविस्तर असें कि,
आष्टी ते कारंजा (घा.)यां दोन तालुक्यातील जोडमार्ग म्हणून ओळखले जाते. यां मार्गांवर थार, बोटोणा, एकाबा, बांबरडा, बोरखेडी, पार्डी, अजनदेवी, नारा अशी गावे यां मार्गांवर येतात. आष्टी हे तालुक्यातील ठिकाण असून येथे शेजारी गावातील नागरिकांची तसेंच शालेय विध्यार्थी यांची नेहमीच रेलचेल असते. दुध विक्रेते यां मार्गांवर नेहमीच व रोज ऐ जा करतात. आष्टी पासून तीन किलोमीटर अंतरावर डांबरीकरण करण्यात आले मात्र उर्वरित रस्ता हा डांबरी करणं झालेला नाही. यां मार्गांवर जागोजागी खडे पडले असून ते अदयापही बुजविण्यात आले नाही. पन्नास वर्षांपूर्वी हा मार्ग निर्माण करण्यात आला होता तेव्हा पासून यां मार्गांवर कुणीही डांबराचा थेंब टाकला नाही. यां मार्गांवर खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते मात्र खड्डे बुजविन्या ऐवजी लाल माती टाकून मंजूर निधी चि वाट लावली होती. बोटोणा पासून पार्डी तर नारा गावा पर्यंत आजही मोठे खड्डे उघड्या डोळ्यातून पाहता येते. आमदार केचे यांच्या अथक प्रयत्नात हा रस्ता मंजूर झाला असें सांगण्यात येते मात्र यां कामाला अदयापही सुरवात झाली नाही. आमदार केचे यांनी हा रस्ताकाम लवकर सुरुकरणार असे म्हटले आहे. रस्ता काम तात्काळ सुरु करावा अशी मागणी जोर धरू लागली आहॆ.