🔥भिडी परीक्षेत्रात सततच्या पावसामुळे कापूस,सोयाबीन ची दयनिय अवस्था,शेतकरी चिंताग्रस्त.
भिडी -/सततच पाऊस सूरू असल्याने काही भागातील शेतक-यांच्या शेतातील कापूस वेचणीला आला तर .सोयाबिन पिकाला येलो मोझॅक या रोगाने ग्रासले असता शेतातून काहीतरी सोयाबीन निघेल या आसेने शेतकरी सोयाबिन सवंगनी करावी या हेतूने शेतात राखून असलेले सोयाबीन शेतात सर्वत्र पानिच पानी असल्याने सवगंनी कसी करावी या चिंतेत शेतकरी पडला आहे
भिडी परीक्षेत्रात सततच्या पावसामुळे कापूस वेचनीला आला तोही पावसाने जमिनीत मिसळवला असुन काही असलेला कापूस कसा वेचावा शेतात जाता येत नाही सर्वत्र पानी व चिखल असल्याने वरून पावसाच्या सरी कोसळत च आहे त्यामूळे काही येणारे पीक तेही जाणारच तर सोयाबीन या पिकाला .येलो मोझॅक या रोगाने पछाडले तरी काही निघेल या आशेवरून झाले झाले सोयाबीन सवंगनी करावी व शेतात जमा करून ठेवावे पन तेही अस्मानी संकट वादळात सह सतत च येत आहे शेतात सर्वत्र पाणीच पाणी सोबीनची संवगनी करता येत नाही सोयाबीन सवंगनी करतांनी झाडाला चिखल व मातीचे पूड येतात सूकण्या साठी कोरडी जागा शेतात नाही करावे तरी काय?असा गंभिर प्रश्न शेतक-यासामोर पडला येत्या दोन दिवसांत जर पाणी आल्यास येणारे ही पीक जमिनीत मिसळतील असे शेतकरी चिंताग्रस्त होऊन सांगत आहे
सध्या या परिसरात कापूस,सोयाबीन या पिकांची दयनीय अवस्था आहे.